

Beed News
esakal
घाटनांदूर: बदलता निसर्ग आणि लहरी हवामानामुळे शेती व्यवसाय संकटात असताना, हनुमंतवाडी (ता. अंबाजोगाई) येथील शेतकऱ्यांनी आता विज्ञानाची कास धरली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (एनडीकेएसपी) शुक्रवारी आयोजित शेतीशाळेत हवामान अनुकूल तंत्रज्ञान या विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शेतावरच खते आणि औषधे तयार करून उत्पादन खर्च शून्यावर कसा आणता येईल, यावर या प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला.