

Jalna News
rsakal
जालना: शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून तापमानाचा पारा आता ४३ अंशांच्या उंबरठ्यावर पोचला आहे. रविवारी (ता. २६) कमाल तापमान ४२.९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २८.३ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात झाली. दरम्यान, या वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असून दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.