मराठवाड्यात आठ मंडळात अतिवृष्टी,तीन जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे

हिंगोली : जिल्ह्यात तीन दिवसापासून गुरुवारी ता. २२ सकाळी दहा वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. मागील चोवीस तासात सकाळी आठ वाजेपर्यंत ४२.६० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने कळमनुरी तालुक्यातील येलकी ते बेलथर जाणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुराने पाच ते सहा गावचा संपर्क तुटला आहे.
हिंगोली : जिल्ह्यात तीन दिवसापासून गुरुवारी ता. २२ सकाळी दहा वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. मागील चोवीस तासात सकाळी आठ वाजेपर्यंत ४२.६० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने कळमनुरी तालुक्यातील येलकी ते बेलथर जाणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुराने पाच ते सहा गावचा संपर्क तुटला आहे.

औरंगाबाद : मराठवाडा विभागात (Rain In Marathwada) रविवारी (ता.२६) दुपारी साडेबारा वाजेपर्यंत गेल्या चोवीस तासात आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तसेच यंदाचा मान्सुनमध्ये झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश परिस्थितीमुळे विभागात बाधित झालेल्या १५ लाख ३१ हजार १७१ हेक्टर क्षेत्रापैकी शुक्रवार(ता.२४) पर्यंत १२ लाख ५२ हजार ३६३ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे झाले आहे. लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोली (Hingoli) या तीन जिल्ह्यात १०० टक्के पंचनामे झाले आहेत. बीड (Beed) जिल्ह्याच्या चकलंबा मंडळात ७३ मिलिमीटर, नांदुरघाट मंडळात ९७ .७५, वडवणी मंडळात ८४ मिलिमीटर. लातूर (Latur) जिल्ह्याच्या किनगाव मंडळात ९७ .५०, उस्मानाबाद जिल्ह्याच्या उस्मानाबाद (Osmanabad) मंडळात ८०.५०, उस्मानाबाद ग्रामीण १०८.२५, परभणी जिल्ह्यातील पिंपळदरी मंडळात ८०.२५ तर चारठाणा मंडळात ६८.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हिंगोली : जिल्ह्यात तीन दिवसापासून गुरुवारी ता. २२ सकाळी दहा वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. मागील चोवीस तासात सकाळी आठ वाजेपर्यंत ४२.६० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने कळमनुरी तालुक्यातील येलकी ते बेलथर जाणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुराने पाच ते सहा गावचा संपर्क तुटला आहे.
Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतकरी धास्तावला


मराठवाडा विभागात अतिवृष्टीने २१ लाख ८२ हजार ७६८ शेतकरी प्रभावित झाले आहेत. त्यापैकी शुक्रवार (ता. २४ ) पर्यंत १८ लाख ५९ हजार १०७ शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. आठ जिल्ह्यात सरासरी ८१.७९ टक्के पंचनामे झाले आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यात ७३.६७ टक्के, जालना जिल्ह्यात ७६ .०९, परभणी जिल्ह्यात ७९.८९, नांदेड जिल्ह्यात ९३.५८ आणि बीड जिल्ह्यात ७९.२१ टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com