Hingoli News : आमचे रक्त विकत घ्या, आम्हाला अन्नधान्य द्या; जगणे कठीण झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्त टाहो

पीक विमा मिळत नसल्यामुळे ‘आमचे रक्त विकत घेऊन सरकारने आम्हाला पोट भरण्यासाठी अन्नधान्य द्यावे’ अशी मागणी गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
hingoli farmers crop insurance compensation demand to cm eknath shinde provide food
hingoli farmers crop insurance compensation demand to cm eknath shinde provide foodSakal

सेनगाव, (जि. हिंगोली) : तालुक्यातील तपोवन येथील शेतकऱ्यांनी दुष्काळी मदत मिळत नाही, शेतमालाला भाव नाही. तसेच पीक विमा मिळत नसल्यामुळे ‘आमचे रक्त विकत घेऊन सरकारने आम्हाला पोट भरण्यासाठी अन्नधान्य द्यावे’ अशी मागणी गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सध्याच्या परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शासनाने शेतकऱ्याच्या शरीरातून ३५० मिलिलिटर रक्त घ्यावे व त्या बदल्यात उदरनिर्वाहासाठी दर महिन्याला दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ व एक लिटर तेल असा शिधा द्यावा, अशी मागणी सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.

यासंदर्भात सेनगाव तालुक्यातील शेतकरी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रवीण मते, विजय कावरखे, राहुल कावरखे, संजय मुळे, सतीश वैद्य यांनी तहसील कार्यालयामार्फत शासनाकडे निवेदन सादर केले आहे.

यावर्षी राज्यामध्ये पावसाने खंड दिल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक दिवस पाऊसच झाला नसल्यामुळे सोयाबीनसारख्या पिकांच्या शेंगा भरल्याच नाही तसेच कापूस व इतर पिकांचीही हीच परिस्थिती आहे.

लागवडीचा खर्चही निघाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचा तसेच उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न भेडसावू लागला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पीक विमा द्यावा, अशी सूचना शासनाने पीक विमा कंपन्यांना देऊनही कंपन्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा दिलाच नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये आणखीन भर पडली आहे. या परिस्थितीमध्ये मुलांचे शिक्षण कसे करावे तसेच उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

घरातील प्रत्येक व्यक्तीचे रक्त घ्या

राज्यातील शेतकऱ्यांना मदत द्यावी या मागणीसाठी यापूर्वी आंदोलने करण्यात आली. मात्र, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाने सणासुदीच्या कालावधीसाठी आनंदाचा शिधा देऊ केला आहे.

त्यामुळे शासनाने आता ‘आमच्या शरीरातील रक्त घ्यावे त्या बदल्यात दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ व एक किलो तेल द्यावे’ अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीचे रक्त घेऊन हा शिधा द्यावा, अशी मागणी ही शेतकऱ्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com