

Hingoli News
esakal
हिंगोली: पोलिस दलात भरती होणे, हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. या स्वप्नासाठी आजची तरुणाई अक्षरशः जिवाचे रान करत असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात दिसून येते. ‘पोलिस व्हायचंच’ या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन अनेक युवक-युवती मेहनत घेत आहेत. या तयारीत त्यांना मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीयांकडून मिळणारी साथ त्यांच्या जिद्दीला अधिक बळ देत आहे.