

Hingoli News
esakal
हिंगोली: राज्यातील रब्बी हंगाम २०२५-२०२६ मधील सहाय्यक स्तरावरील पिकांची नोंदणी करण्यासाठी राज्य शासनाने आता ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हिंगोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी अद्याप तांत्रिक अडचणींमुळे किंवा इतर कारणांमुळे प्रलंबित आहे, त्यांना मोठा दिलासा मिळाला असून पीक विमा व इतर शासकीय लाभांपासून ते वंचित राहणार नाहीत, याची खबरदारी शासनाने घेतली आहे.