महायुतीच्या विरोधातील कारवाईत औरंगाबादेतील बंडखोरांना मात्र अभय

file photo
file photo


औरंगाबाद : महायुतीच्या विरोधातील बंडखोर उमेदवारास भाजपमधून गुरुवारी (ता.11) बडतर्फ करण्यात आले. ही कारवाई मात्र भाजपने हातचे राखूनच केल्याचे बोलले जात आहे. कारण औरंगाबाद शहरात महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केलेल्यांवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केलेली नाही. 


महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या चरण वाघमारे, (तुमसर), गीता जैन, (मीरा भाईंदर), बाळासाहेब ओव्हाळ, (पिंपरी चिंचवड), दिलीप देशमुख, (अहमदपूर, लातूर) यांच्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे. भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. असे असताना औरंगाबाद जिल्ह्यात भाजपकडून बंडखोरी केलेल्यांना अभय देण्यात आल्याची चर्चा आहे. औरंगाबाद पश्‍चिममधून महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या विरोधात बंडखोरी करणारे भाजपचे नगरसेवक राजू शिंदे तसेच कन्नडमध्ये बंड केलेले बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार यांना मात्र पक्षाने अभय दिले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेने तक्रार देऊनही कुठलीच कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. 

...तरी मोडला पक्षादेश 

औरंगाबाद पश्‍चिममधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे भाजपचे राजू शिंदे यांना वरिष्ठांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंत्या केल्या होत्या; मात्र फोन बंद करून अज्ञातस्थळी होते. शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. वरिष्ठांचा आदेश झुगारला. पक्षाने कारवाई करताना तुरळक बंडखोरांवरच कारवाई केली आहे. आता औरंगाबादच्या बंडखोरांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com