

Jalna Tragedy
esakal
अशोक चांगले
सुखापुरी: शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या बांधावर लावलेली बेकायदेशीर वीजप्रवाहाची तार दोन पशुपालकाच्या सहा शेळ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरली. रुई शिवारातील गट क्रमांक १४५ मध्ये विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने सहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २९ जुलै रोजी दुपारी घडली. या घटनेत पशुपालक संतोष लहू मुळे व संतोष बिडे यांचे अंदाजे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी तीर्थपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.