Mohan Bhagwat : डॉक्टरांनी आरोग्यसेवेचा धर्म पाळावा ; विवेकानंद कर्करोग विस्तारित रुग्णालयाचे लोकार्पण

प्राचीन आणि सध्याच्या आधुनिक चिकित्सा पद्धतीची सांगड घालून आपल्याला पुढे जावे लागेल. आरोग्यसेवा सुलभ आणि स्वस्त असली पाहिजे. यासाठी केवळ शासनाने प्रयत्न करून चालणार नाही तर त्यात लोकसहभागही असला पाहिजे.
Mohan Bhagwat
Mohan Bhagwatsakal

लातूर : प्राचीन आणि सध्याच्या आधुनिक चिकित्सा पद्धतीची सांगड घालून आपल्याला पुढे जावे लागेल. आरोग्यसेवा सुलभ आणि स्वस्त असली पाहिजे. यासाठी केवळ शासनाने प्रयत्न करून चालणार नाही तर त्यात लोकसहभागही असला पाहिजे. आरोग्यसेवा हा काही व्यवसाय नाही, तो एक धर्म आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी हा धर्म पाळला तर आपला देश आरोग्य क्षेत्रात आघाडीवर राहील. नागरिक सदृढ, तंदुरुस्त राहिले तर देश विश्वगुरू बनेल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केले.

येथील विवेकानंद कर्करोग आणि सुपर स्पेशालिटी विस्तारित रुग्णालयाचे लोकार्पण डॉ. भागवत यांच्या हस्ते मंगळवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, मुंबईच्या टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, देवगिरी प्रांताध्यक्ष अनिल भालेराव, विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर, वैद्यकीय संचालक डॉ. अरुणा देवधर, प्रकल्प समन्वयक डॉ. ब्रिजमोहन झंवर आदी उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले, ‘आपल्याकडे चिकित्सा पद्धतीत ज्ञानाचे भांडार आहे. पण, आपण आपल्याला विसरून गेलो आहोत. आयुर्वेद चांगली चिकित्सा असून या पद्धतीतून उपचार करून त्याचे रेकॉर्ड ठेवण्याची गरज आहे. सुदृढ भारत करण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी पुढे आले पाहिजे. कोरोनाचा काळ, राम मंदिरावेळी ज्या पद्धतीने देश एकत्र आला, त्याच पद्धतीने या क्षेत्रासाठी एकत्रित येण्याची गरज आहे. आरोग्यसेवा कमाईचे साधन नाही, हा धर्म असून तो सर्वांनी पाळला तर आरोग्याच्या बाबतीत जगात भारत सर्वात पुढे राहील’. विवेकानंद रुग्णालयासारखी संस्था तीर्थक्षेत्रासारखे काम करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. झंवर यांनी प्रास्ताविक केले. अंधोरीकर यांनी आभार मानले.

जगाला दाखविली ‘वील पॉवर’

मांडविया म्हणाले, ‘जगासाठी आरोग्य क्षेत्र व्यवसाय आहे, पण आपल्यासाठी सेवा आहे. कोरोना काळात आपण दीडशे देशांना औषधांचा पुरवठा करू शकलो. यात सेवाभाव हाच उद्देश होता. ‘ब्रेन पॉवर’, ‘मॅन पॉवर’सोबतच आपण ‘वील पॉवर’ही दाखवून दिली. आपल्या संस्कृतीत, आपल्या जीवनशैलीत अनेक समस्यांचे निराकरण आहे. ती आत्मसात करण्याची गरज आहे’.

रोगच होऊ नये यासाठी प्रयत्न हवेत

डॉ. बडवे म्हणाले,‘शहरीकरणामुळे कर्करोग वाढत आहे. या रोगावरील औषधे महागडी आहेत. एक नवीन औषध आले असून त्याची किंमत साडेचार कोटी रुपये आहे. त्याच पद्धतीचे औषध आम्ही ‘मुंबई आयआयटी’सोबत संशोधन करून २३ लाखांत तयार केले आहे. पण, याच्या किमती अजून कमी होण्याची गरज आहे. ब्रेस्ट कॅन्सरवर एक संशोधन कररून ६० रुपयांच्या इंजेक्शनने ३० टक्के रुग्णांचे जीव वाचविण्यात यश आले आहे. उपचारापेक्षा रोगच होऊ नये, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे’.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com