गेवराई - आजकाल जातीय संघर्ष वाढत आहेत. समाजा-समाजात जातीय दरी निर्माण होत असताना अशा परिस्थितीत लोक काय म्हणतील याबाबत कोणताही विचार न करता जाती-पातीच्या भिंती तोडून बीडमधील गेवराईतील एका वधू पित्याने मुलीचा आंतरजातीय विवाह लावून दिला..यावेळी वधू व वर मंडळींकडून कोणतीही मानपान देवाण घेवाण अदी भानगडीत न पडता तसेच अनाठायी खर्चाला देखील फाटा देऊन मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत एका प्रसिद्ध संस्थानवर आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात हा विवाह सोहळा पार पडला.हा आदर्श पायंडा समाजासमोर मालेगाव बुद्रुक (ता. गेवराई, जि. बीड) येथील कवी तथा लेखक कैलास बोरकर यांनी घालून दिला असून सर्व समाजातून त्यांचे कौतुक होत आहे..मालेगाव बुद्रुक येथील कवी तथा लेखक कैलास बोरकर हे मागील काही वर्षापासून श्रीक्षेत्र ओझर (ता. जुन्नर, जि. पुणे) याठिकाणी वास्तव्यास आहेत. दरम्यान त्यांनी येथीलच शिवाजीराव कवडे यांचा मुलगा चि.शुभम ऊर्फ मयुरेश याच्याशी आपली मुलगी शिवप्रिती हिचा विवाह लावण्याचा निर्णय घेतला. कवी कैलास बोरकर हे जातीने धनगर समाजाचे असताना त्यांनी मराठा समाजातील कवडे कुटुंबाशी नाते जोडण्याचा मोठा निर्णय घेतला..यावेळी त्यांनी कुटुंब तसेच नातेवाईक यांना विश्वासात घेऊन जाती-पातीला मुठमाती देऊन समाजासमोर आदर्श निर्माण निश्चय केला. तसेच हे नातेसंबंध जोडताना बोरकर व कवडे कुटुंबातील देवाणघेवाण करायची नाही, तसेच अनाठायी खर्चाला देखील फाटा देण्याचा निर्णय घेतला.यानंतर शिवप्रिती व शुभम यांचा विवाह हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र वडज येथील श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थानवर आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात विवाह सोहळा आयोजित केला. त्यानुसार मोजक्याच नातेवाईकांना निमंत्रित करुन रविवार ता १९ जानेवारी रोजी हा विवाह सोहळा श्री कुलस्वामी खंडेराय संस्थानच्या अत्यल्प खर्चात पार पडला..त्यामुळे कवी कैलास बोरकर यांनी जातीच्या भिंतीचा विचार न करता व लोक काय म्हणतील, याकडे लक्ष न देता एक आंतरजातीय विवाह सोहळा पार पाडून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे, याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विवाह सोहळ्यासाठी लेखक, कवी, पत्रकार तसेच बोरकर व कवडे परिवार यांचे नातेवाईक, मित्र परिवार उपस्थित होते..जाती अंतासाठी आंतरजातीय विवाह होणे गरजेचे -जाती पातीच्या दरी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. मात्र आम्ही लिखाण करताना कोणतेही जात-पात डोळ्यासमोर न ठेवता लिहीतो. त्यामुळे या जात-पातीच्या भिंती तोडल्या गेल्या पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन 'आधी आपण करायचे, नंतर हा आदर्श समाजासमोर सांगायचा' हा निश्चय करुन मी माझी मुलगी शिवप्रिती हिचा विवाह आंतरजातीय करुन दिला. या विवाहामुळे माझ्यासह कुटुंब, नातेवाईक आनंदीत आहेत. दरम्यान जाती अंतासाठी आंतरजातीय विवाह होणे गरजेचे आहे असे कैलास बोरकर यांनी सांगीतले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
गेवराई - आजकाल जातीय संघर्ष वाढत आहेत. समाजा-समाजात जातीय दरी निर्माण होत असताना अशा परिस्थितीत लोक काय म्हणतील याबाबत कोणताही विचार न करता जाती-पातीच्या भिंती तोडून बीडमधील गेवराईतील एका वधू पित्याने मुलीचा आंतरजातीय विवाह लावून दिला..यावेळी वधू व वर मंडळींकडून कोणतीही मानपान देवाण घेवाण अदी भानगडीत न पडता तसेच अनाठायी खर्चाला देखील फाटा देऊन मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत एका प्रसिद्ध संस्थानवर आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात हा विवाह सोहळा पार पडला.हा आदर्श पायंडा समाजासमोर मालेगाव बुद्रुक (ता. गेवराई, जि. बीड) येथील कवी तथा लेखक कैलास बोरकर यांनी घालून दिला असून सर्व समाजातून त्यांचे कौतुक होत आहे..मालेगाव बुद्रुक येथील कवी तथा लेखक कैलास बोरकर हे मागील काही वर्षापासून श्रीक्षेत्र ओझर (ता. जुन्नर, जि. पुणे) याठिकाणी वास्तव्यास आहेत. दरम्यान त्यांनी येथीलच शिवाजीराव कवडे यांचा मुलगा चि.शुभम ऊर्फ मयुरेश याच्याशी आपली मुलगी शिवप्रिती हिचा विवाह लावण्याचा निर्णय घेतला. कवी कैलास बोरकर हे जातीने धनगर समाजाचे असताना त्यांनी मराठा समाजातील कवडे कुटुंबाशी नाते जोडण्याचा मोठा निर्णय घेतला..यावेळी त्यांनी कुटुंब तसेच नातेवाईक यांना विश्वासात घेऊन जाती-पातीला मुठमाती देऊन समाजासमोर आदर्श निर्माण निश्चय केला. तसेच हे नातेसंबंध जोडताना बोरकर व कवडे कुटुंबातील देवाणघेवाण करायची नाही, तसेच अनाठायी खर्चाला देखील फाटा देण्याचा निर्णय घेतला.यानंतर शिवप्रिती व शुभम यांचा विवाह हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र वडज येथील श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थानवर आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात विवाह सोहळा आयोजित केला. त्यानुसार मोजक्याच नातेवाईकांना निमंत्रित करुन रविवार ता १९ जानेवारी रोजी हा विवाह सोहळा श्री कुलस्वामी खंडेराय संस्थानच्या अत्यल्प खर्चात पार पडला..त्यामुळे कवी कैलास बोरकर यांनी जातीच्या भिंतीचा विचार न करता व लोक काय म्हणतील, याकडे लक्ष न देता एक आंतरजातीय विवाह सोहळा पार पाडून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे, याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विवाह सोहळ्यासाठी लेखक, कवी, पत्रकार तसेच बोरकर व कवडे परिवार यांचे नातेवाईक, मित्र परिवार उपस्थित होते..जाती अंतासाठी आंतरजातीय विवाह होणे गरजेचे -जाती पातीच्या दरी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. मात्र आम्ही लिखाण करताना कोणतेही जात-पात डोळ्यासमोर न ठेवता लिहीतो. त्यामुळे या जात-पातीच्या भिंती तोडल्या गेल्या पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन 'आधी आपण करायचे, नंतर हा आदर्श समाजासमोर सांगायचा' हा निश्चय करुन मी माझी मुलगी शिवप्रिती हिचा विवाह आंतरजातीय करुन दिला. या विवाहामुळे माझ्यासह कुटुंब, नातेवाईक आनंदीत आहेत. दरम्यान जाती अंतासाठी आंतरजातीय विवाह होणे गरजेचे आहे असे कैलास बोरकर यांनी सांगीतले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.