well collapse by rain
sakal
कायगाव - गेल्या वर्षी 2025 च्या खरीप हंगामात अतिवृष्टी, पूरस्थिती यामुळे सिंचन विहिरी खचल्या, बुजल्या त्यांची पडझड होऊन गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. विहीर पडझडीचे पंचनामे झाले, प्रस्ताव तहसीलला गेले, पण 6 महिने उलटूनही "निधीचे काय?" असा प्रश्न शेतकरी-नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे पैसे रखडल्याने त्यांच्यासमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे.