

Jalna News
esakal
जालना: जिल्ह्यात महिनाभरापासून उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवत असून, तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा कडाका असह्य झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, नागरिकांनी उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कूलिंगच्या वस्तू खरेदीला पसंती दिली आहे. मागील दोन महिन्यांत एसी, टेबल फॅन, फ्रीज आणि कूलरमधून कोटींची उलाढाल झाली आहे.