

Jalna News
esakal
जालना: शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलिस मदत केंद्रालाही कायम टाळे असल्याने चोरट्यांचे फावते आहे. दरम्यान, पाकीटमारी, दागिने चोरी जाण्याच्या दिवसाला सरासरी चार घटना घडत असताना पोलिसांकडे मात्र महिन्याला केवळ सात ते आठ तक्रारींचीच नोंद होत असल्याने चित्र आहे.