Jalna : जिल्ह्यात पाणीटंचाईची चिंता

सहा कोटी ४४ लाखांचा टंचाई निवारण आराखडा; दोन गावांचा टॅंकरसाठी प्रस्ताव
Water Scarcity
Water Scarcityesakal

जालना : जिल्ह्यात यंदा पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १६२ गावे व दोन वाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ येण्यासाठी शक्यता आहे. आजघडीला जिल्हा प्रशासनाकडे दोन गावांकडून टँकर सुरू करण्याच्या मागणीचा प्रस्ताव दाखल झालेला आहे. या टंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून सहा कोटी ४४ लाख दोन हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गतवर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, गत वर्षी जिल्ह्यात असमतोल पाऊस झाला. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करण्याचे वेळ येणार आहे. यात पुढील दोन महिने म्हणजे मे आणि जून महिन्यादरम्यान जिल्ह्यातील १६२ गावांसह दोन वाड्यांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून खाजगी विहीर अधिग्रहण आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी सहा कोटी ४४ लाख दोन हजारांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. हा आराखडा एप्रिल ते जून या कालवधीत पाणी टंचाई निवारणासाठी करण्यात आला आहे. सुदैवाने एप्रिल महिन्यात आतापर्यंत तरी पाणी टंचाईचा प्रश्‍न भेडसावला नाही.

मात्र, पुढील दोन महिन्यात जिल्ह्यातील १६२ गावे व दोन वाड्यांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्‍न निर्माण होण्यासाठी शक्यता आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाकडे दोन गावांकडून टँकरची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील तपोवन तांडा आणि घनसावंगी तालुक्यातील बोरगाव खुर्द तीन तांड्याचा समावेश आहे.

जिल्ह्यात २६ टक्के उपयुक्त पाणीसाठा

जालना जिल्ह्यात सात मध्यम व ५७ लघू प्रकल्पामध्ये मागील पंधरा दिवसांमध्ये चार टक्के उपयुक्त पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात केवळ २६.२३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

यंदा जिल्ह्यावर पाणी टंचाईचे ढग घोंघावत आहेत. मागील वर्षी झालेल्या असमतोल पावसामुळे सध्या मध्यम व लघू प्रकल्पांमधील पाणी पातळी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मोठी घट झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात सात मध्यम व ५७ लघू प्रकल्पात २६.२३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यात जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पांमध्ये ३४.५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून अंबड तालुक्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी जोत्याखाली आहे. तर भोकरदन शहरासह आसपासच्या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जुई मध्यम प्रकल्पातही केवळ ११.२८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्पात ६१.७४, कल्याण गिरजा प्रकल्पात ५९.०८, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात ५४.७९, भोकरदन तालुक्यातील धामना मध्यम प्रकल्प २०.४५, जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा मध्यम प्रकल्पात २०.४५ उपयुक्त पाणीसाठा आहे.

तर जिल्ह्यात ५७ लघू प्रकल्पांमध्ये २२.२३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यात १७ लघू प्रकल्पांची पाणी पातळी ही जोत्याखाली असल्याचे चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com