

Jalna News
esakal
जालना: आखाती राष्ट्रांत सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम सांगून किराणा विक्रेते जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून वस्तू चढ्या दराने सर्रास विक्री करत आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तूंची अवैध साठेबाजी आणि चढ्या दराने वस्तू विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. मात्र, जिल्हा पुरवठा विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने विक्रेत्यांच्या नफेखोरीला अधिकाऱ्यांचे अप्रत्यक्ष पाठबळ आहे की काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.