

Jalna Maha-Walkathon
esakal
जालना: जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जलसंधारण विभागाच्या वतीने शुक्रवारी ( ता. २१) आयोजित करण्यात आलेल्या ‘महा-वॉकॅथॉन’मध्ये विद्यार्थ्यांना मुदत संपलेली बिस्किटे वाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीतच विद्यार्थ्यांना या बिस्किटांचे वाटप करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.