

Jalna News
esakal
जालना: शहरात मॉन्सूनपूर्व तयारीच्या नावाखाली महावितरणकडून झाडांची सर्रास कत्तल केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याऐवजी थेट मुळावरच घाव घातला आहे.
विविध सामाजिक संस्थांनी आणि पर्यावरणप्रेमींनी वर्षानुवर्षे जतन केलेली व वाढवलेली झाडे अशा पद्धतीने तोडल्याने संताप व्यक्त केला आहे.