

जालना: शहराच्या स्वच्छतेचा महापालिकेकडून दावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात शहर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकले आहे. चौकाचौकात कचऱ्याचे ढीग असून सतत कचरा पेटवण्याचे प्रकार सुरू आहेत.
शिवाय महापालिकेकडून शहरातील हा कचरा संकलन करून चक्क उघड्या वाहनांतून कचरा वाहतूक केली जाते. त्यामुळे वाहनातील कचरा रस्त्यावर पडतो. तसेच दुर्गधीनेही नागरिक त्रस्त आहेत. यावरून महापालिकेने कचरा वाहतुकीच्या नियमांचा कचरा केल्याचे चित्र आहे.