

Jalna News
esakal
जालना: किरकोळ बाजारात अत्यावश्यक वस्तूंच्या दरवाढीने नागरिकांना पुन्हा एकदा फटका बसला आहे. सोयाबीन तेल व साबुदाण्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सोयाबीन तेलाच्या दरात प्रतिकिलो १५ रुपयांची वाढ होऊन दर १६५ रुपयांवर पोचले, तर साबुदाणा १० रुपयांनी वधारून ६० रुपये किलो झाला आहे. या दरवाढीमुळे गृहिणींचे मासिक बजेट कोलमडले आहे.