

Jalna
esakal
जालना: कृषी विभागामार्फत महिला बचत गटाला वितरीत करण्यात आलेल्या मोफत सोयाबीन बियाण्याची उगवणच झाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील रेवगाव येथील १५ शेतकऱ्यांनी सुमारे १० हेक्टर क्षेत्रावर या बियाण्याची पेरणी केली, त्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च झाला असून, बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.