

Jalna News
esakal
जालना राजकीय नेत्यांकडून शहरातील वीज खांबावर बायडिंग तारेच्या साह्याने जाहिरात फलक लावले जात आहेत. मात्र, हे अनधिकृत जाहिरात फलक नागरिकांसाठी जीवघेणे झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फलक रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांसह दुचाकी चालक, पादचाऱ्यांच्या अंगावर कोसळू शकतात. त्यामुळे या अनधिकृत जाहिरात फलकांमुळे जीवित हानी झाली, तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.