

Jalna News
esakal
जालना: शहरात सध्या आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, मनपा निवडणुकीत आठवड्यातून दोनवेळा पाणी देण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम निधीअभावी रखडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पुढील दोन-तीन दिवसांत जालना-जायकवाडी जलवाहिनीची देखभाल तसेच अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम करणाऱ्या संबंधित एजन्सीसोबत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रखडलेले काम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.