Manoj Jarange : ...तर आंदोलन समाजाच्या हाती जाईल : जरांगे,राज्य सरकारला इशारा

शासनाने मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला आहे. वीस फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेतले जाणार आहे. त्यात अध्यादेश व सगेसोयऱ्यांबाबत कायदा मंजूर करून शासनाने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे.
Manoj Jarange
Manoj Jarangesakal

वडीगोद्री (ता. अंबड) : शासनाने मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला आहे. वीस फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेतले जाणार आहे. त्यात अध्यादेश व सगेसोयऱ्यांबाबत कायदा मंजूर करून शासनाने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे. शासनाने अध्यादेश, मसुदा देऊनही अंमलबजावणी न केल्याने समाजाचा रोष आहे. वीस फेब्रुवारीपर्यंत निर्णय न झाल्यास पुढील आंदोलन समाजाच्या हातात जाईल. त्याला शासन जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे जरांगेंच्या उपोषणाचा आज सातवा दिवस होता. काल रात्रीपासून त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यायला सुरवात केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. मागासवर्ग आयोगाच्या कामासाठी कर्मचारी नियुक्त केले, समितीला मुदतवाढ दिली. सगेसोयऱ्यांबाबत कायदा मंजूर करून हे दोघे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण निश्चित देतील.

मराठा समाजाला आयोग, कुणबी, सगेसोयऱ्यांमधून आरक्षण मिळणार आहे. शासनाने आता वीस तारखेच्या आत सगेसोयऱ्यांबाबतचा कायदा मंजूर करावा, हैद्राबादचे गॅझेट स्वीकारावे, संस्थाने, मंदिर, भाट आदी ठिकाणच्या नोंदी स्वीकाराव्यात, शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. तोपर्यंत उपोषण थांबणार नाही. २०, २१ फेब्रुवारीनंतर होणारे आंदोलन माझ्या हाती राहणार नाही, ते समाजाच्या हातात असेल. त्याची जबाबदारी शासनावर असेल. निवडणूक आचारसंहिता लागली तरी निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी लढा सुरूच राहील’.

Manoj Jarange
Maratha Reservation : मराठवाड्यात ठिकठिकाणी पुन्हा आंदोलनाची धग ; मराठा आरक्षण,रास्ता रोको, चक्का जाम

मुंबईला जाऊन फसवणूक झाली असे म्हणता येणार नाही. निर्णयाच्या अंमलबजावणीत फसवणूक होत आहे, असे म्हणावे लागेल. सरकारवर वीस तारखेपर्यंत विश्वास आहे, असे सांगून समाजबांधव, न्यायालयाचा आदर ठेवत वैद्यकीय उपचार घेत आहे, असे जरांगे यांनी सांगितले.]

मंत्री नारायण राणे यांना इशारा

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओबीसींचा अभिमान आहे. नारायण राणे, तुम्ही मराठा आहात. तुम्हाला समाजाचा अभिमान पाहिजे. तुम्ही मध्येमध्ये बोलण्याचा ठेका घेतला आहे? तुम्ही समाजाच्या बाजूने बोलले पाहिजे. आतापर्यंत तुम्ही पाचवेळा माझ्यावर टीका केली आहे. तुमचे वय झाले म्हणून तुमचा आदर केला. यापुढे तुमची टीका सहन करणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल. नीलेश राणे, तुम्ही त्यांना समजून सांगा’ असे जरांगे म्हणाले. काहींना सतत नावे ठेवण्याचे काम आहे. त्यांनी आता गप्प बसावे, असा सल्ला त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com