

Water discharge of 10,000 cusecs has begun from the Jayakwadi (Nathsagar) Dam into the Godavari river. Authorities have urged residents of riverside villages to remain alert as the discharge may be increased or reduced depending on inflows.
Sakal
पैठण : येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन मंगळवारी (ता .४) सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणाच्या क्रमांक एक ते अठरा या दरवाजातून हे पाणी सोडण्यात आले आहे.