

Parbhani News
esakal
जिंतूर: एकीकडे वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत. शहरासह संपूर्ण तालुक्यात विजेची समस्या गंभीर बनली आहे. ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.