

Parbhani News
esakal
जिंतूर: तालुक्यातील पाझर, सिंचन तसेच गावपातळीवरील तलाव मार्च महिन्यातच कोरडेठाक पडल्याने यंदाच्या उन्हाळ्यात जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. समाधानकारक पावसाच्या नोंदी असूनही जमिनीतील पाणीपातळी अपेक्षितरीत्या न वाढल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.