

Dharashiv News
esakal
कळंब: शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी असलेल्या नगरपालिका यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या कळंब शहरात दिसत आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले असून तुंबलेल्या नाल्या, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.