कळंब : तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे. यामुळे कांदा, आंबा, टरबूज फळबागेचे नुकसान झाले आहे. शेतात काढलेला कांदा भिजून अक्षरशः लाल चिखल झाला आहे. कांद्याच्या चाळींवरील पत्रे वादळात उडाल्याने कांदा भिजून तो शेतातच सडत आहे..आठवडाभरापासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कांदा काढून शेतात ठेवला, मात्र तो भिजल्याने खराब झाला. .शिवाय काढणीला आलेल्या कांद्याचेही नुकसान झाले आहे. तालुक्यातील १५० हेक्टरवर कांद्याचे पीक नासून गेले असून, कष्टाबरोबरच केलेला खर्चही पाण्यात गेल्याने शेतकरी अडचणी सापडले आहेत. तालुक्यात बारमाही कांद्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असून, उन्हाळी कांदा टिकाऊ असल्याने त्याच्या उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळले आहेत..मात्र, यंदा मे महिन्यातच पावसाने जोरदार फटका दिल्याने काढणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील कांदा खराब झाला आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक तयार झाल्यानंतर, कांदा उपटून शेतात झाकून ठेवला होता..CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनीही विचारले, ‘कुठेय पाणी?’ संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर ‘सकाळ’ने हलवले मंत्रालय.मात्र, तो पाऊस लागल्याने सडला, तर तालुक्यातील १५० हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तलाठी, कृषी सहायक यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.