

Dharashiv News
esakal
कळंब: तालुक्यात एप्रिलच्या सुरवातीलाच उन्हाचा तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याने उष्णतेच्या लाटेमुळे दैनंदिन जीवन विस्कळित झाले असून अनेक ठिकाणी कूपनलिका व विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी, तालुक्यात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला असून, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.