

Dharshiv News
esakal
कळंब: शहरातील ढोकी रोड, परळी रोड आणि येरमाळा रोडवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची तीव्र कोंडी होत असून, हे रस्ते अपघातप्रवण बनले आहेत. नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मात्र, ती केवळ दिखाऊपणा ठरल्याचे दिसून आले. हातगाडे, फळविक्रेते व व्यावसायिकांचे फलक रस्त्यावर आल्याने साठ फुटांचे रस्ते दहा फुटांवर आले आहेत.