

Hingoli News
esakal
कळमनुरी: बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून परिसरात अवेळी पावसाचे सावट निर्माण झाले असून, त्यामुळे गहू पिकाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकाची काढणी करण्यासाठी मोठी लगबग सुरू केली आहे. मात्र, एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर काढणीसाठी हार्वेस्टर यंत्रांची उपलब्धता कमी पडत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.