हिंगोली : जिल्ह्यात (Hingoli) मागील आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. मंगळवारी (ता.२८) पहाटेपासुन संततधार पाऊस सुरू आहे. आज सुर्यदर्शन देखील झाले नाही. या पावसामुळे सोडेगाव (ता. कळमनुरी) (Kalamnuri) येथून वाहणाऱ्या कयाधु नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने या मार्गावरील वीस गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. तो अद्यापही सुरुच आहे. मंगळवारी भल्यापहाटेपासून संततधार सुरू झालेला पाऊस (Rain In Hingoli) सुरुच आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहराजवळुन वाहणाऱ्या कयाधु नदीला (Kayadhu River) पुर आला आहे. तसेच जिल्ह्यातुन वाहणारी पैनगंगा नदी, आसना नदी दुथडी भरून वाहत आहे.
इतरही नदी, ओढ्याना पुर आला आहे. कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव गावाजवळून वाहणाऱ्या कयाधु नदीचे पाणी पुलावरून जात असल्याने उमरा फाटा ते बोल्डा फाटा जाणारा रस्ता बंद झाला आहे. या मार्गावर येणाऱ्या वीस ते पंचवीस गावांचा संपर्क तुटला आहे. यासह वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथे नदीचे पाणी गावात शिरले आहे. पावसाने सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी केलेले सोयाबीन पिक पाण्यात तरंगत आहे. तर कापूस, तुर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हा पाऊस हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यात सर्वदुर सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असुन शहरातील रस्त्यावर शुकशुकाट आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.