Krushi Sevak Bharti : जागा सोळाशे, अर्ज सव्वादोन लाख; राज्यात कृषी सेवकांच्या भरतीची स्थिती, उमेदवारांत वाढणार स्पर्धा

कृषी सेवकांच्या एक हजार ६८५ जागांसाठी शासनाकडे दोन लाख २५ हजारांपेक्षा अधिक अर्ज आले
krushi sevak recruitment post 2 lakh application for 1600 posts unemployment latur
krushi sevak recruitment post 2 lakh application for 1600 posts unemployment latursakal

Latur News: राज्यात सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण किती वाढत चालले आहे, हे शासनाच्या पदभरतीत येणाऱ्या अर्जांवरून दिसत आहे. राज्यातील कृषी विभागात कृषी सेवकांची पद भरती केली जाणार आहे. कृषी सेवकांच्या एक हजार ६८५ जागांसाठी शासनाकडे दोन लाख २५ हजारांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. या पदासाठी १६ व १९ जानेवारीला ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. एका पदासाठी सरासरी १३३ पेक्षा जास्त अर्ज असल्याने मोठी स्पर्धा आहे.

आदिवासी भाग सोडून भरती

राज्यात कृषी विभागात २०२१ मध्ये कृषी सेवकांची पद भरती करण्यात आली होती. आता दोन वर्षानंतरही पद भरती होत आहे. राज्यात शासनाच्या आदेशानुसार आदिवासी (पेसा) क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध आहेत.

त्यामुळे आदिवासी विरहित (नॉन-पेसा) क्षेत्र विभागातील पदे भरली जाणार आहेत. राज्यात कृषी विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहायकांची रिक्त पदे आता कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरली जात आहेत.

कृषी विभागाने पदभरतीसाठीची ऑगस्ट २०२३ मध्ये जाहिरात दिली होती. राज्यातीलआठ विभागांतून उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. तीन ऑक्टोबरपर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आठ विभागांतील एक हजार ६८५ जागांसाठी दोन लाख २५ हजार अर्ज आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली

तर वाढली असती ३०० पदे

कृषी विभागातर्फे दोन वर्षानंतर कृषीसेवक पदांची भरती होत असली तरी कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध अंतिम झालेला नाही. त्यामुळे ८० टक्के रिक्त पदे भरली जात आहेत. आकृतिबंध तयार झाला असता तर आणखी ३०० पदांची संख्या वाढली असती. त्याचा फायदा सुशिक्षित बेरोजगारांना झाला असता.

खासगी कंपनी घेणार परीक्षा

राज्यातील आठ विभागांत सर्वाधिक ३६५ पदे नागपूर विभागात भरली जात आहेत. २५० पदे कोल्हापूर तर ठाणे विभागात २४७ पदे भरली जाणार आहेत. यासाठी ‘आयबीपीएस’ या खासगी कंपनीतर्फे राज्यात १६ व १९ जानेवारीला ऑनलाइन परीक्षा होणार आहे.

लातूर विभागातील लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत कृषी सेवकांची १५९ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी १६ व १९ जानेवारीला ‘आयबीपीएस’ कंपनीतर्फे ऑनलाइन परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठीचे याच कंपनीतर्फे उमेदवारांना प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

- साहेबराव दिवेकर, विभागीय कृषी सहसंचालक, लातूर विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com