

Latur News
esakal
लातूर: महागाईबरोबरच आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे कारण सांगत शहरातील रिक्षाचालकांनी मनमानी पद्धतीने रिक्षा भाडे वाढवले आहे. या भाडेवाढीची माहिती अद्याप प्रशासनाला नाही. त्यामुळे ऐन अडचणीच्या काळात सर्वसामान्य प्रवाशांची लूट सुरू झाली आहे. एकीकडे सिलिंडरसाठी धावपळ तर दुसरीकडे मनमानी भाववाढ या कात्रीत अनेक सर्वसामान्य अडकले आहेत. यासंदर्भात प्रशासन कठोर पावले उचलून मनमानी दरवाढ रोखणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.