

Latur News
esakal
लातूर: ‘शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करू’, असे आश्वासन देऊन महापालिकेत सत्ता काबीज केलेल्या नेत्यांना नियमित पाणी देण्याचे विस्मरण झाले. भर उन्हाळ्यात शहरात आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांच्या नळाला मात्र पाणी नाही. त्यामुळे लातूरकरांचा घसा कोरडा पडला आहे. याकडे लातूरचे कारभारी कधी लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.