

Latur News
esakal
लातूर: लातूरला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या मांजरा धरणातून उपसा केलेल्या पाणी पट्टी भरण्याकडे महापालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यातून ३२ कोटीची थकबाकी झाली आहे. वारंवार नोटीस देवून देखील महापालिकेकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. त्याचा परिणाम जलसंपदा विभागाने मांजरा धरणातून शहराला होणारा पाणी पुरवठा तोडला आहे. सध्या आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत आहे. त्यात हा पाणी पुरवठा तोडला गेल्याने पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रक कोलमडून जाणार आहे.