उमरगा : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. अनेक कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी, सोशल मीडिया व इतर माध्यमावर आक्रमक व चुकीच्या पद्धतीने व्यक्त होत आहेत.
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी जो निर्णय घेतील, त्याचे पालन करत मतदारसंघाच्या हितासाठी महत्वाचा असेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांनी सांगितले.
प्रा. बिराजदार लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक आहेत, गेल्या आठ ते दहा महिन्यापासुन संपूर्ण मतदार संघ त्यांनी पिंजुन काढला आहे. बार्शी ते शिर्सी इतपर्यंत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.
एक निष्कलंक, मितभाषी व्यक्तीमत्व म्हणुन त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल असे वातावरण होते. मात्र गेल्या चार दिवसापासुन दुसऱ्याच उमेदवारांची नाव बाहेर येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त होत आहेत. या संदर्भाने प्रा.बिराजदार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आपले नेते असुन त्यांचा आदेश आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे. सोशल मीडिया, वृत्तपत्र, वाहिन्या इत्यादीवर प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या आधारावर चुकीचा निर्णय अथवा चुकीचे पाऊल उचलू नये. अजित पवार जो निर्णय घेतील तो देशाच्या, राज्याच्या व धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या हिताचा असणार आहे. असे त्यांनी आवाहन केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.