Collector Vinay Gowda watching crop
sakal
- रामेश्वर अमृते
गंगापूर - जिल्ह्यात पर्जन्यमानाची स्थिती अद्याप समाधानकारक नसून उद्भवलेल्या या परिस्थितीचा थेट परिणाम खरीप पिकांवर दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी, महसूल, ग्रामविकास आणि संबंधित सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान व पीक परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावे असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत.