
लातूर : दोन महिने ज्या वीजग्राहकांचे देयक थकलेले असेल त्यांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाईल, असा निर्णय महावितरणने घेतला आहे. निर्णयाची जुलैपासून अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी नियमित व दरमहा वीज देयक भरावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.