

Parbhani News
esakal
परभणी: कीटकजन्य आजार असलेल्या मलेरियावर जिल्ह्याने मागील चार वर्षांत प्रभावी नियंत्रण मिळवले असून या कालावधीत एकही मृत्यू नोंदवला गेलेला नाही, अशी माहिती जिल्हा हिवताप विभागाने दिली आहे. सातत्यपूर्ण सर्वेक्षण, मोठ्या प्रमाणावर रक्त तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे हा यशस्वी परिणाम साधता आला आहे.