

Hingoli
esakal
हिंगोली: माळसेलू येथील जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा मुख्य रस्ता पावसामुळे चिखलमय झाला असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोज चिखल तुडवत साचलेल्या डबक्यातून मार्ग काढावा लागत आहे. यावेळी अनेक विद्यार्थी पाय घसरून पडत असून याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याने पालकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.