

Latur News
esakal
लातूर: दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मांजरा धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे धरण ढवळून निघाले. परिणामी धरणातील पाण्याला पिवळेपणा आला असून, अशा पिवळ्या पाण्याचा शहराला महापालिकेच्या वतीने पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत, तर यावर उपाययोजनेचे काम सुरू असल्याची माहिती महापालिका देत आहे.