शासनाने समाजाच्या आरक्षण मागणीकडे दुर्लक्ष करू नये. समाज तुमच्याकडे येणाऱ्या काळात दुर्लक्ष करेल ते तुम्हाला परवडणार नाही, असा इशारा जरांगे यांनी शासनाला दिला आहे.
वडीगोद्री : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे (Manoj Jarange) आपल्या उपोषणावर ठाम आहेत. त्यांचा आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. या ठिकाणी पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी सांगितलं की, 'भेटायला जे येतात त्या आमदार, खासदार, मंत्री यांनी आरक्षणाची बाजू लावून धरावी.'
तसेच आज सरकारकडून मंत्री शंभूराज देसाई अंतरवाली सराटीत येणार आहेत, त्यांना येऊद्या. काय चर्चा करतात ते बघतो, काही निर्णय होतो का? शासनाची काय भूमिका आहे हे देसाई आल्यानंतर कळणार आहे. त्यानंतर समाजासोबत चर्चा करून पुढचा निर्णय व दिशा ठरवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शासनाने समाजाच्या आरक्षण मागणीकडे दुर्लक्ष करू नये. समाज तुमच्याकडे येणाऱ्या काळात दुर्लक्ष करेल ते तुम्हाला परवडणार नाही, असा इशारा जरांगे यांनी शासनाला दिला आहे. काल (बुधवार) बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जरांगे यांची भेट घेतली आणि आरक्षणाचा प्रश्न सोडण्यासाठी खासदारांना एकत्र करून शासनाला निवेदन देणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.