
आडूळ : मुंबई येथील मराठा आंदोलकांसाठी पैठण तालुक्यातील आडूळ बु येथून सोमवारी ( ता. १ ) रोजी रात्री ११ वाजता खाद्यपदार्थ पाठविण्यात आले.रविवारी रात्री येथील मारुती मंदिरात मराठा समाज व मुस्लीम बांधवांची संयुक्तिकरित्या बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीत लोकसहभागातून वर्गणी जमा करून आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेल्या मराठा समाज बांधवांची कोणतीही खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना गावातून भाजी भाकरी,ठेचा,पाणी,बॉटल,चिवडा,लोणचे आदी साहित्य पाठविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.