Ambad water scarcity
Sakal
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर ही तेरा गावात भीषण पाणी टंचाईचे सावट सावट निर्माण झाले आहे.अनेक भागात म्हणावी तशी दमदार हजेरी न लावल्याने विहिरी, कूपनलिका, पाझर तलाव, लघु तलाव यांच्या पाणी पातळीत किंचित ही वाढ झालेली नाही. यामुळे ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण करून टँकरव्दारे पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.