

MLA Kailas Patil's Demand Accepted; Government Assures Unconditional MGNREGA Subsidy
esakal
-दिलीप गंभिरे
कळंब : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर काम करणाऱ्या मजूरांची उपस्थिती नोंदविण्यासाठी गावांतील ग्राम रोजगार सेवकामार्फत मोबाईल एन.एम.एम.एस.या अँपचा वापर करून दिवसातून दोन वेळा सकाळी ६ ते ११ व दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत फोटो घेणे बंधनकारक केले आहे.ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या रोजगार सेवकांना मोबाईल देण्यात आलेला नाही.ज्या ग्राम रोजगार सेवकाकडे मोबाईल आहे.त्याच्या मोबाईलला ग्रामीण भागात नेट राहत नसल्यामुळे ग्रामीण भागात हे अँप चालत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अट जाचक असून यामुळे वैयक्तिक लाभांच्या सिंचनविहिरी,गोठे आदी योजेनेला ब्रेक लागला आहे.त्यामुळे विनाअट वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी शेतकऱ्यांना पैसे द्यावेत अशी मागणी विधानसभेत आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.