

Delayed Monsoon Impacts Farming Plans; Experts Urge Caution Before Sowing
esakal
-जमील पठाण
कायगाव: नैऋत्य मान्सूनचे आगमन होऊनही गंगापूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मृग नक्षत्र सुरू होऊनही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. हवामान खात्याकडून मिळणाऱ्या ‘तारीख पे तारीख’च्या अंदाजामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.