

Parbhani
esakal
सेलू: मे महिन्यापासून सुरू झालेले रोहिणी नक्षत्र यंदा बहुतांश ठिकाणी कोरडेच गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा आता मृग नक्षत्रावर खिळल्या आहेत. जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी समाधानकारक पावसाची चिन्हे दिसत नसल्याने, खरीप हंगामाच्या तोंडावर बळिराजाची चिंता वाढली आहे.