Navratri : भगर खाताय, जरा जपून

डॉक्टरांचा सल्ला, मंठ्यात अनेकांना विषबाधा
navratri
navratrisakal

मंठा : नवरात्रोत्सवानिमित्त सध्या अनेक भाविक उपवास करतात. उपवासाच्या पदार्थांसह भगरीचा आहारही घेतला जातो. मात्र काही दिवसांपासून भगर खाल्‍ल्याने विषबाधा होण्याच्या घटना घडत आहेत. त्यात मंठा परिसरातही असे प्रकार सोमवार, तसेच मंगळवारी घडले. त्यामुळे भगर विकत घेताना, खाताना काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त अनेक भाविक उपवास धरतात. काही भाविक फलाहार, सुकामेवा किंवा फक्त दूध पिऊन उपवास धरतात. तर बहुतेक भाविक उपवास काळात भगर, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, पेंडखजूर आदी उपवासाचे पदार्थ आहारासाठी वापरतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून भगर खाल्ल्याने विषबाधा होण्याचे प्रकार घडत आहेत. यात परतूर तालुक्यातील परतवाडी अकोली येथेही 21सप्टेंबरला दुकानातील भगर खाल्याने दोघांना विषबाधा झाली होती, त्यानंतर खांडवीवाडी व वलखेड गावात सोमवारी दहा जणांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली आहे.

आता भगर खाल्ल्याने त्रास होण्याचा प्रकार मंठ्यातही सुरू झाला आहे, येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवारी रात्री उलट्या होणे, मळमळ होणे, हात पाय गळून गेले, चक्कर येणे, थकवा जाणवणे असे सहा रुग्ण व मंगळवारी तीन असे नऊ रुग्ण दाखल झाले होते. तर याच प्रकारची लक्षणे असलेले डॉ. प्रवीण सानप यांच्या हॉस्पिटलमध्ये सोमवारी पंधरा व मंगळवारी सात असे बावीस रुग्ण दाखल झाले होते. इतरही काही खाजगी रुग्णालयात भगर खाल्ल्याने त्रास होत असल्याचे दाखल झाले आहेत. अनेक ग्रामीण रुग्णालय, रुग्ण खाजगी रुग्णालय व काही रुग्ण जालना येथे उपचार घेत आहेत. रुग्णालय दाखल झालेल्या सर्वच रुग्णांना उपवास होता. यातील सर्वांनीच भगर खाल्ली होती, अशी माहिती डॉ. प्रताप चाटसे व डॉ. सानप यांनी दिली आहे.

ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना अन्नातून विषबाधा झाली होती. उपचारानंतर रुग्ण घरी गेले आहेत. दाखल झालेल्या सर्वच लोकांना उपवास होता. त्यांनी उपवासादरम्यान भगर खाल्ली होती. नागरिकांनी उपवास करताना भगरीची गुणवत्ता पहावी, शक्यतो भगर खाणे टाळावे.

-डॉ. प्रताप चाटसे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, मंठा

उपवासादरम्यान चक्कर आली, उलट्या झाल्या, थकवा आला, हातपाय गळून गेले, हात पायाचा थरकाप होत आहे असे बावीस रुग्ण दाखल झाले होते. यातील सर्वांनाच उपवास होता व त्यांनी उपवासादरम्यान भगर खाल्ली होती. जुनी किंवा बुरशी असलेली भगर खाण्यात आली असावी. नागरिकांनी अशी भगर खाणे टाळावे.

- प्रवीण सानप, डॉक्टर, मंठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com