विरोधकांना उमेदवारच मिळेना ः रावसाहेब दानवे

file photo
file photo
Updated on

औरंगाबाद : "काल राष्ट्रवादीच्या एक बड्या नेत्यासोबत होतो. त्यांच्याशी गप्पा मारताना उमेदवारांची यादी का जाहीर करत नाही असे विचारले असता ते म्हणाले, की आम्ही तुमच्या यादीची वाट पाहत आहोत. तुमच्यातील जे सटकतील ते आमच्याकडे येतील, तेव्हा आम्हाला उमेदवार मिळेल. इतकी पुअर पोझिशन ऍपोझिशन पक्षाची झाली असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. 

औरंगाबादेत प्रचार कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी श्री. दानवे बोलत होते. भाजप-शिवसेनेसाठी देशात चांगले वातावरण आहे. यामुळे राज्यात 225 जागा निवडून येतील. दीडशे वर्षांची कॉंग्रेस संपत चालली आहे. रोज एक आमदार राजीनामा घेऊन येत आहे. त्यांनाही पारखूनच आम्ही प्रवेश देत आहोत. त्यांना राजीनामा का देताय विचारल्यानंतर ते म्हणतात, "आमच्या अध्यक्षांनीच राजीनामा दिलेला आहे.' 

पुढचा सुवर्णकाळ आहे. ड्रायपोर्ट, डीएमआयसी, समृद्धी महामार्गामुळे जालना, औरंगाबाद शहर एक होईल. येथे मुंबई, पुणेप्रमाणे मेट्रो चालवावी लागेल. देशभरातून मोदींनी मोठा निधी आणला आहे. यात 35 टक्‍के गुंतवणूक राज्यात केली आहे. त्याकडे आमचे लक्ष आहे. 
अंबादास दानवे आणि सावे यांची जोडी चांगली आहे. जोडी चांगली असेल तर कामे होतात. अंबादास दानवे यांनी आता नेतृत्व हाती घ्यावे. लोकसभेच्या वेळी अतुल सावेंनी चांगले काम केले आहे. आता अंबादास दानवेंनी पुढाकार घेत विधानसभेसाठी काम करावे, असेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com